talathi bharti maharashtra | महाराष्ट्रातील तरुणांसाठी माहित मोठी खुशखबर समोर आली आहे. गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेल्या 1700 तलाठी पदाचा आता एकूण 4644 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही माहिती दिली असून राज्यभरातील नोकरीचे प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. talathi bharti maharashtra
हे पण वाचा | रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी
महसूल विभागाच्या माहितीनुसार, ही भरती राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. विभागाने सांगितला आहे की अधिकृत अधिसूचना डिसेंबर 2025 पर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू केली जाईल त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी करणार आहे.

महसूल सेवकांना राखीव जागा आणि अतिरिक्त गुणांचा लाभ :
या भरतीत महसूल सेवकांनाही न्याय देण्यासाठी खास योजना राबवली आहे. महसूल सेवक संघटनेने मागणी केली होती की त्यांना नियमित वेतनश्रेणी मिळावी मात्र विभागाची चर्चेनंतर सरकारने त्यांना तलाठी भरतीत राखीव जागा आणि अनुभवावर आधारित रिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले की महसूल सेवकाचे सर्व प्रश्न प्रधान्याने सोडवले जातील.
भरती प्रक्रिया, पात्रता परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया :
- पात्रता : कोणतीही शाखेचा पदवीधर, MSCIT किंवा सक्षम प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष ( आरक्षणानुसार सवलत लागू )
- परीक्षा पद्धत : कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट ( CBT) ही परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे.
परीक्षा पॅटर्न :
- मराठी : 25 गुण
- इंग्रजी : 25 गुण
- सामान्य ज्ञान : 40 गुण
- बुद्धिमत्ता चाचणी : 10 गुण
- एकूण कालावधी : 2 तास
- नकारात्मक गुणन: 1/4 गुण
- अर्ज शुल्क : 350 ते 500 रुपये ( श्रेणीनुसार)
- अर्जाची अपेक्षित सुरुवात : सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in

तलाठी हा फक्त सरकारी कर्मचारी नसेल तो गावाचा महसूल आणि जमीन नोंदणीचा मुख्य आधारस्तंभ असतो. अनेक ठिकाणी पद रिक्त असल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अडचणींना समोर जावं लागत आहे, त्यामुळे ही भरती केवळ नोकरीची नाही तर ग्रामीण प्रशासनाला नवी उभारी देणारी प्रक्रिया करणार आहे.
हे पण वाचा | रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी
सरकारची ही भरती योजना अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरेल प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात तलाठीच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम होईल. रोजगाराच्या शोधात भटकणार्यात युवकांसाठी ही भरती एक मोठी संधी घेऊन आली आहे.
अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा