Maharashtra unseasonal rain forecast | सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. आणि हवामान खात्याचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी चिंतेचा ठरणार आहे. खरे तर गेले काही दिवसांपासून वातावरणामध्ये होणारा बदल हा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हैरान करून सोडत आहे. सकाळी कडक ऊन आणि दुपारी अंगाची लाहीलाही करणारी उष्णता तर संध्याकाळी अचानक पावसासाठी पोषक वातावरण अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे. कधी गारपीट तरी कधी मुसळधार पाऊस तर कधी 40 45 अंश तापमान याबद्दल त्या परिस्थितीमुळे नागरिकांसह शेतकरी मोठा चिंतेत सापडलेला आहे. Maharashtra unseasonal rain forecast
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासातील महत्त्वाचे असल्याचा इशारा दिलेला आहे. राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांना हा अलर्ट जारी केलेला असून काही भागात अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अचानक परिस्थिती बदलू शकते. दुपारनंतर ढग दाटून येतील आणि मेघा गर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी हवामान अंदाज आजचा योग्य आढावा घेऊनच बाहेर पडावे.
तर दुसरीकडे विदर्भ आणि काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर उष्णघाताचा धोका वाढल्याने दुपारी बारा ते चार दरम्यान बाहेर न पडण्याचा सल्ला देखील शासनाच्या माध्यमातून दिला जात आहे.
सध्या परिस्थिती अशा सुरू झालेल्या आहे कारण शेतामध्ये पिकांची कारणे सुरू आहे आणि येणारा अचानक पाऊस वादळी वाऱ्याने गारपीट यामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काढलेले पीक सुशिक्षित ठिकाणी ठेवण्याच्या आवाहन करण्यात आले.
एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे पावसाचा धोका अशा दुहेरी संकटामुळे पुढील दोन दिवस खूप सतर्क राहण्याचे ठरणार आहेत. हवामानाचा बदलता अंदाज लक्षात घेऊन घरा बाहेर पडा कारण पुढील 48 तास खरोखरच निर्णय ठरणार आहेत.
हे पण वाचा : राज्यातील या 33 जिल्ह्यांना मोठा इशारा; अवकाळी पावसाचा मोठा तडाका बसणार
