Maharashtra Police Bharti 2025 : राज्यातील हजारो पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये शिपाई पासून चालक आणि बँड्समन पर्यंतच्या हजारो पदांसाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर पासून सुरू झाली असूनही सुवर्णसंधी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहणार आहे , म्हणजे तुम्हाला अजून पूर्ण महिनाभर अर्ज भरता येणार आहे.
👇👇👇
पोलीस भरती 2025 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या भरती मध्ये एकूण 15631 पदांकरिता ही भरती घेतली जाणार आहे. यामध्ये पॉलिश शिपाई पदाकरिता 12,399, चालक शिपाई पदाकरिता 234, सशस्त्र पोलीस शिपाई 2393, कारागृह शिपाई 580 आणि बँड्समन 25 असे पदे आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती राबवली जाणारा असून पोलीस विभागात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही योग्य वेळ आहे.

अर्ज प्रक्रिया कशी असणार ?
या भरतीकरिता अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारांना थेट policerecruitment2025.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरून घ्यायचा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज मान्य केला जाणार आहे. कोणतेही दलालावर किंवा अनोळखी व्यक्तींचा आश्वासनावर विश्वास ठेवू नका ही भरती पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाणार आहे.

ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात राबवली जाणार आहे पहिला टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी तुम्हाला शारीरिक चाचणी 50 गुणाची असणार आहे यामध्ये रनिंग, गोळा फेक, यासारख्या घटकांचा समावेश असणार आहे. पात्र ठरण्यासाठी तुम्हाला किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. त्यानंतर लेखी परीक्षा 100 गुणांची राहणार आहे ज्यामध्ये मराठी सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नावर प्रश्न विचारले जातील. यामध्ये तुम्हाला पात्रतेसाठी किमान 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे दोन्ही परीक्षेचे एकत्रित 150 गुणावर अंतिम निवड होणार आहे.
👇👇👇
पोलीस भरती 2025 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !
यावर्षी सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे, तो म्हणजे 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा पूर्ण झालेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अनेक तरुणांना दुसरी संधी मिळणार आहे ही गोष्ट राज्यभरातील हजारो तरुणांसाठी आशाचे किरण ठरणार आहे.

मागील वर्षी महाराष्ट्रात तब्बल 18000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती राबवली गेली होती. आणि लाखो तरुणांनी सहभाग घेतला होता त्याच पद्धतीने यावर्षीही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे ग्रामीण भागातील तरुण शेतकरी चे मुलं रोजंदारी करणारी युवक सगळ्यांसाठी पोलीस दलात प्रवेश करण्याचे हे दार खुले झाले आहे.
तरुणाईसाठी ही फक्त नोकरीच नव्हे तर समाजसेवेची संधी आहे पोलीस दलात काम करणं म्हणजे जबाबदारी, त्याचबरोबर सन्मान आणि एक स्थिर नोकरी त्यामुळे 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात अर्ज नक्की करा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या.

टीप : एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा भरती संबंधी सर्व अपडेट्स आणि सूचना फक्त अधिकृत संकेतस्थळावर पहा, अफवा खोटी लिंक किंवा फसव्या जाहिरातीपासून सावधान रहा.
👇👇👇

