WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यावरती पुन्हा एकदा मोठे संकट ! प्रशासनाचा मोठा हाय अलर्ट? नेमकी इशारा काय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Forecast April : राज्यातील हवामानाबाबत पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने आणि प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील या सूचनांचे पालन करणे खूप गरजेचे असणार आहे कारण अजून एप्रिल महिना अर्धा तास झाला आहे पण उन्हाचे मात्र मे महिन्यात सारखे सत्र सुरू झालेले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अंगावर आग पडते तर दुपारी रस्त्यावरती कोणी दिसत नाही.  शेतात काम करणारे शेतकरी असो किंवा शहरात कामासाठी निघालेला माणूस असो सगळ्यांची अवस्था एकच आहे हे उन्हात सहन होत नाही अशी झाली आहे. IMD Weather Forecast April

सध्या महाराष्ट्रावरती असेच एक मोठा संकट निर्माण झालेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 च्या वर गेल असून काही ठिकाणी 43 44° c पर्यंत पोहोचला आहे. अकोल्यात तर तापमान थेट 44 संस्थेचा टप्पा ओलांडत आहे म्हणजे सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उष्णताची तीव्रता सर्वाधिक वाढत चाललेली आहे. सोलापूर, नागपूर, वर्धा,  धाराशिव, मालेगाव या भागात 43° तापमानाची नोंद झाली तर गडचिरोली जळगाव परभणी यवतमाळ वाशिम बुलढाणा या भागातही पारा 42 च्या वर गेला आहे. लोक त्यामुळे घराबाहेर पडला देखील घाबरत आहे. परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचे अनेक ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे.  कोकणापासून विदर्भ पर्यंत मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पालघर अमरावती धुळे पहिल्या नगर सोलापूर सांगली नाशिक सातारा नांदेड अकोला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये यात समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच हे संकट काही एक-दोन जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यभर पसरल आहे.

यातच हवामान विभागाने आणखी एक मोठा इशारा दिलेला आहे पुढील काही दिवसात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणजे एकीकडे ऊन दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका असे दुहेरी संकट निर्माण झालेली आहे .

अकोला, वाशिम, गोंदिया अशा भागात तर परिस्थिती गंभीर बनली आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यावर शुखशुकाट दिसतोय. लोक फक्त अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडताना दिसत आहे. शासनाने देखील स्पष्ट सांगितले आहे की दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणार शक्यतो टाळाच.

तर या पार्श्वभूमीवरती काही सूचना देखील शासनाने दिलेले आहेत डॉक्टर आणि प्रशासनाने सांगितला आहे की तहान लागली नाही तरी पाणी प्या लिंबू पाणी प्या ताक ORS घ्या. डोके झाकून ठेवा हलके सुती कपडे वापरा डोकेदुखी चक्कर अशक्तपणा असे लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा. एकंदरीतच सर्व परिस्थिती पाहता राज्याचे वातावरण खरच बिघडलेला आहे त्यामुळे स्वतःची काळजी आणि कुटुंबाची काळजी घेणे खूप महत्त्वाचा आहे.

Leave a Comment