Pm Kisan Yojana 21th Hapta | देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे खूपच आनंदाची असणार आहे. कारण आता दिवाळीचा मोठा सण आलेला आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळालेली ही बातमी खरंच दिलासादायक ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान (Pm Kisan Samman Nidhi Yojana2025) निधी योजनेचा 21 वा हप्ता केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे.

हा हप्ता भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये (₹2000/-) जमा करण्यात आलेले आहेत. जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण (Agriculture Minister Shivraj Chavan) यांनी तब्बल 171 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यामुळे तिथल्या आठ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट रक्कम जमा झाली आहे. त्यात महिला शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पण महाराष्ट्रातील शेतकरी मात्र हवालदील झालेले आहेत त्यांना सरकार कधी पैसे देईल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. Pm Kisan Yojana 21th Hapta
दरम्यान केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब आणि हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 540 कोटी रुपयाहून अधिक रक्कम पाठवली. या राज्यांमध्ये अतिवृष्टी, भूस्खलन आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. परंतु आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला, पिक वाहून गेलं शेतकरी संकटात सापडले अजून तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत.
शेतकऱ्यांमध्ये आता एकच चर्चा?

केंद्र सरकारच्या सूत्रानुसार, इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी हप्त्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. मात्र ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पाडणार. ज्या शेतकऱ्यांनी e KYC प्रक्रिया आधार लिंक आणि पात्रता पडताळणी पूर्ण केली आहे त्यांनाच रक्कम मिळणार आहे. ज्यांनी अपडेट केले नाही, त्यांना थोडी उशिराने मदत मिळेल किंवा थांबावा लागेल.
जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमचं नाव लाभार्थ्यांची यादीत आहे का, तर PmKisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी कॉर्नर या पर्यावरण क्लिक करा. तिथे लाभार्थ्यांची यादी निवडा आणि तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक भरा आणि त्यानंतर Get Data या पर्यावर क्लिक करा. लगेच समजेल की रक्कम जमा झाली की नाही.

जर e KYC पूर्ण असूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर त्यासाठी सरकारने काही हेल्पलाइन नंबर देखील दिले आहेत त्यासाठी शेतकरी बांधवांनी 1800-115-5525 किंवा 155261 या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता.
सध्या देशभरातील शेतकऱ्यांची नजर दिवाळीपूर्वी या दोन हजार रुपयांच्या मदतीकडे आहे. सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेल्या इतर राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळाले आहेत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे आता सरकार कधी हा निर्णय घेते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
Pm Kisan Yojana म्हणजे काय?
देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी व त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्माननिधी (Pm Kisan Samman Nidhi Yojana) राबवली जी देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या आता थोडी आर्थिक मदत आणणे, जेणेकरून त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खत, औषधी आणि तर गरजेच्या वस्तूंसाठी थोडंसं स्थैर्य मिळणे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000. रुपये मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे दर चार महिन्यांनी ₹2000 रुपये दिले जातात.
Pm Kisan योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

- यासाठी सर्वात प्रथम, PmKisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर तिथे गेल्यावर नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्याची माहिती भरून नोंदणी करा.
- त्यानंतर तुमची बँक खाते, जमीन तपशील आणि ओळखपत्र अपलोड करा. E KYC प्रक्रिया पूर्ण करा.
पी एम किसान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?
पी एम किसान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मध्ये तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar Card), बँक पासबुक (Bank passbook), जमिनीची नोंदणी कागदपत्र (7/12 आणि 8 A उतारा), ओळखपत्र, आणि मोबाईल नंबर इत्यादी.
