Post office Yojana 2025 | शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा चढउतारीच वातावरण निर्माण झाल आहे. यामुळे लोक आता पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत कोणी सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे तर कोणी एफडी योजना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक चांगल्या प्रकारची आणि परतावा मिळवायचा विचार करत असाल तर अशातच पोस्ट ऑफिस ची एक खास योजना पुन्हा चर्चेत आली आहे. जिथे तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यावर तब्बल पाच लाख 55 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. तर गुंतवणूक कशाप्रकारे करणार जाणून घेऊया सविस्तर माहिती. Post office Yojana 2025
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा

शेअर बाजारात नेहमी धोका असतो, दरवेळेस फायदाच होईल असा नाही. सध्या म्युचल फंड मध्ये देखील चढउतार आहेत, पण पोस्ट ऑफिसच्या योजना आजही विश्वासाचे प्रतीक आहे. कारण सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजना सुरक्षित असतात आणि त्यावर व्याजही ठराविक असतं. आज आपण अशाच एक जबरदस्ती योजने विषयी माहिती जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम.
ही योजना नेमकी काय आहे?

ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच ठरावी गुंतवणूक करावी लागते. त्या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळते. म्हणजे तुम्ही कामात असल, शेतात असाल किंवा निवृत्त असाल तरी दर महिन्याला तुमच्याकडे स्थिर उत्पन्न येत राहतात. सध्या या योजनेवर 7.4 टक्के व्याजदर देत आहे, जो बाजारातील अनेक फंडांपेक्षा जास्त आहे. योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा
एकट्याच आणि जॉईंट अकाउंट दोन्ही प्रकार उपलब्ध
या योजनेत तुम्ही एकट्याने खात उघडू शकता किंवा जोडीदारासोबत संयुक्त खातही उघडता येतं. सिंगल अकाउंट साठी जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नव लाख रुपये आहे. जॉईंट अकाउंट साठी ही मर्यादा पंधरा लाख रुपये आहे.

किती मिळेल व्याज?
जर तुम्ही या योजनेमध्ये जॉईंट अकाउंट मधून 15 लाख रुपये गुंतवले, तुम्हाला दर महिन्याला ₹9,250 इतकं व्याज मिळेल. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला ₹1,11,000 इतक उत्पन्न मिळेल. तर संपूर्ण पाच वर्षाच्या कालावधीत मिळणारी एकूण रक्कम होते तब्बल ₹5 लाख 55 हजार रुपये.

ही सरकारी हमी असलेली योजना असल्याने पैशांचा धोका शून्य आहे. दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळतं, ज्यामुळे निवृत्त लोकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम परत मिळते, त्यामुळे सुरक्षितेसह स्थिर नफा मिळतो. योजना उघडताना PAN आणि आधार कार्ड आवश्यक आहे. खाते किमान एक वर्षानंतरच बंद करता येते. लहान गुंतवणूकदार, शेतकरी, कामगार किंवा निवृत्त व्यक्तीसाठी ही योजना एकदम मस्त आहे.
( Disclaimer | वरील दिलेली माहिती केवळ माहिती करीत आहे आर्थिक गुंतवणुकी जबाबदारी कुठलाही सल्ला देत नाही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा
