WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रावर मोठ संकट! या भागात अवकाळी पावसाचा इशारा; पुढील 48 तास महत्त्वाचे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : महाराष्ट्रातील हवामान सध्या अत्यंत बदलत्या स्वरूपाचं होत चाललं आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अचानक अवकाळी पावसाचं संकट डोकं वर काढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे आणि काही ठिकाणी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान तज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या द्रोणीच्या प्रभावामुळे वातावरणात मोठा बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. मात्र आता १४ आणि १५ मार्च दरम्यान या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. अचानक होणाऱ्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंशांच्या आसपास असल्याने दुपारच्या वेळेत रस्ते जवळपास ओस पडलेले दिसत आहेत. कडक उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही-लाही होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यात तर उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. येथे तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट दिसत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे आणि सावलीत राहणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका जनावरांनाही बसू लागला आहे. तापमान झपाट्याने वाढल्यामुळे गुरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दूध उत्पादनावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांना सावली, पुरेसे पाणी आणि योग्य आहार देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे कोकणात मात्र पूर्णपणे वेगळे हवामान दिसून येत आहे. सकाळी दाट धुक्याची चादर पसरलेली असते, तर दुपारनंतर अचानक उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. गेल्या चार दिवसांपासून कोकणातील अनेक भागांत सकाळी ९ वाजेपर्यंत दाट धुके दिसत आहे. त्यानंतर मात्र तापमान झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

मराठवाडा भागातही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Weather Update

एकूणच पाहता महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी परिणाम दिसत आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि पशुपालक यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे पुढील काही दिवस राज्यातील परिस्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment