Maharashtra Weather Alert : महाराष्ट्र राज्यावर गेल्या काही दिवसापासून पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार गाजवला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, अशा सर्व भागात सध्या आभाळ दाटून आला आहे. आधीच नद्यांच्या काठावर राहणाऱ्या गावकऱ्यांना पुराचा फटका बसला असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात, आणि घरी उध्वस्त झाली आहेत, रस्ते वाहून गेले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याची आणि शक्य तितके खबरदारी पाळण्याची आव्हान केले आहे. राज्याच्या जवळ हवेच्या तुम्ही दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे 27 आणि 28 सप्टेंबर या दोन दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी सजग राणा आवश्यक आहे, आधीच ज्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे तिथं अजून बचाव कार्य सुरू आहे या पार्श्वभूमी 48 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
48 तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार पाऊस ?

आजपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. कोकण गोवा आणि विदर्भ भागातील देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे , पुढील 48 तासात रायगड, पुणे, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, यह सर्व जिल्ह्यामध्ये विजेचा कडकराट , सोसाट्याचा वारा , वाऱ्यासहलका ती मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
यामध्ये विशेष म्हणजे, पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि या जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
विदर्भामध्ये पावसाचा कहर
विदर्भ विभागातल्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात विजेच्या कडकडासह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागात अर्जंट जारी करण्यात आला आहे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढणार आहे गेल्या काही दिवसात विदर्भात नद्याच्या पातळी झपाट्याने वाढू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडला आहे.

पुणे शहरांमध्ये पुढील दोन दिवस, ढगाळ वातावरण राहणार आहे. मेघगर्जना विजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या कारणामुळे पुणेकरांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे पुण्यातील घाट विभागाला देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये आतापर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की धाराशिव, अहमदनगर ,जळगाव, सोलापूर, बीड, परभणी या जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाले आहे आणि या पावसामुळे मोठे प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. राज्यात आतापर्यंत 975 मिलिमीटर पाऊस झाला असून हा सरासरीपेक्षा तब्बल 102% जास्त आहे यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली :

या झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना झाला आहे. खरीप पिक मधील कापूस, सोयाबीन, उडीद , तूर यासारख्या अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर पावसाने थैमान फिरवली आहे एका शेतकऱ्याचे म्हणणे आहे की आम्ही देवच राहतो शेतात काम करू पीक व केलं पण निसर्गाचा राग टाळणं आमच्यात हातात नाही आता सरकारनं मदतीचा हात द्यावा.
