WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हरभऱ्याचे बाजारभाव वाढले, या बाजार समितीमध्ये मिळाले 8500 रुपये दर वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Harbara bajar bhav April 7 2026 | राज्यात हरभऱ्याच्या बाजारात आज पुन्हा एकदा मोठा गोंधळ पाहायला मिळाला सकाळपासून अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होती, पण भाव पाहिल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती काही ठिकाणी चांगला दर मिळाला, तर काही बाजारात माल अक्षरशः पडून राहिला गेल्या काही दिवसांपासून शेतकरी थोडे दिवस थांबू, भाव वाढेल” या आशेवर माल घरात ठेवून होता पण आजचे दर पाहिल्यावर अनेकांच्या मनात पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. Harbara bajar bhav April 7 2026

आजच्या बाजारात सर्वात जास्त चर्चा झाली ती जळगाव बाजार समितीची कारण इथे नं. १ हरभऱ्याला तब्बल ८५५० रुपयांपर्यंत दर मिळाला तर नं. २ हरभऱ्यालाही ७९९५ रुपयांपर्यंत भाव गेला एवढा मोठा दर मिळाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी दर्जेदार माल राखून ठेवला होता, त्यांना थोडा दिलासा मिळाला गावाकडच्या भाषेत सांगायचं तर ज्यांनी घाई केली नाही, त्यांचा माल आज सोनं झाला अशी चर्चा बाजारात ऐकायला मिळत होती.

हे पण वाचा : आजचा कांदा बाजार भाव १० मार्च 2026 | महाराष्ट्रातील बाजार समितीमधील कांदा बाजार भाव

पण हीच परिस्थिती सगळीकडे नाही अनेक बाजारात अजूनही हरभऱ्याचा भाव ५००० च्या आसपासच अडकलेला आहे अहिल्यानगरमध्ये सरासरी ४८२५ रुपये, हिंगोलीत ५०९५, कारंजामध्ये ५२३०, तर करमाळ्यात ५०५१ रुपये असा भाव राहिला म्हणजे शेतकऱ्याला अपेक्षित असलेला दर अजूनही मिळत नाहीये एकीकडे खत, औषध, मजुरी आणि पाण्याचा खर्च वाढलेला आणि दुसरीकडे माल विकायला नेला की भाव पडतो त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

हे पण वाचा: महाराष्ट्रातील तूर बाजारभावात मोठा चढ-उतार, नवीन बाजार भाव काय आहेत? पहा सविस्तर बाजार भाव

लातूर बाजारात मोठी आवक झाली तब्बल ६८९२ क्विंटल हरभरा बाजारात आला पण एवढी आवक असूनही सरासरी ५४२५ रुपयांचा भाव टिकून राहिला त्यामुळे लातूर परिसरातील शेतकऱ्यांनी थोडा समाधानाचा श्वास घेतला कारण अनेकांना भीती होती की आवक वाढली की भाव कोसळेल पण आज तसं झालं नाही.

विदर्भातही वेगवेगळं चित्र दिसलं अकोल्यात ५६३० पर्यंत भाव मिळाला, नागपुरात ५४१४, अमरावतीत ५३२५ तर मेहकरमध्ये ५३१५ पर्यंत भाव गेला पण याच भागात आष्टीमध्ये काही शेतकऱ्यांना फक्त ४००० रुपयांपासून व्यवहार करावा लागला काटोलमध्ये ४५०० पासून दर सुरू झाले म्हणजे एकाच राज्यात, एकाच दिवशी, एका बाजूला ८५०० आणि दुसऱ्या बाजूला ४००० हा फरक पाहून शेतकरीच गोंधळून गेला आहे.

सोलापूर, तुळजापूर, मुरूम, निलंगा, औराद शहाजानी या भागातही बाजार थोडा स्थिर दिसला बहुतांश व्यवहार ५१०० ते ५४०० या दरम्यान झाले पण अनेक शेतकरी अजूनही माल विकायला तयार नाहीत आता थोडे दिवस थांबलो तर भाव अजून वाढेल अशी आशा अनेकांनी धरून ठेवली आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे चांगला, कोरडा आणि निवडलेला माल आहे, ते सध्या बाजारात घाई करत नाहीत.

दरम्यान, काबुली हरभऱ्याने मात्र आज वेगळंच चित्र दाखवलं जळगावमध्ये काबुली हरभऱ्याला ७७३५ रुपयांचा दर मिळाला त्यामुळे ज्यांनी काबुलीची लागवड केली होती, त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे काही व्यापाऱ्यांनी तर पुढील आठवड्यात काबुलीचा भाव अजून वाढू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

गावात बसून अनेक शेतकरी आता एकच प्रश्न विचारत आहेत माल आत्ता विकायचा का अजून थांबायचं?कारण बाजारात अजूनही स्पष्ट दिशा दिसत नाहीये काही बाजारात भाव वाढतोय, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा कमी होतोय व्यापारीही सध्या सावध आहेत मोठ्या प्रमाणात माल उचलत नाहीत त्यामुळे बाजार पूर्णपणे अनिश्चित दिसतोय.

हे पण वाचा : आजचे बाजरी बाजार भाव : महाराष्ट्रातील नवीन बाजरी भाव जाहीर झाले पहा नवीन बाजार भाव

यातच हवामानाचा प्रश्न वेगळाच आहे राज्यात उष्णता वाढतेय काही भागात अवकाळी पावसाचाही अंदाज आहे जर पुढील काही दिवसांत पाऊस झाला, तर घरात ठेवलेला हरभरा खराब होण्याची भीती आहे त्यामुळे अनेक शेतकरी कमी भावात का होईना, पण माल विकून टाकू या विचारात आहेत. तर काही जण अजून थांबून मोठ्या दराची वाट पाहत आहेत.

एकूण पाहिलं तर हरभऱ्याच्या बाजारात सध्या सरळ चित्र नाही कुठे दर वाढलेत, कुठे घसरलेत, तर कुठे स्थिर आहेत पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे यंदा ज्याने माल चांगला राखून ठेवला, घाई केली नाही आणि योग्य बाजार निवडला, त्यालाच जास्त फायदा होणार आहे बाकी शेतकऱ्यांसाठी अजूनही प्रतीक्षा आणि चिंता दोन्ही कायम आहेत.

हे पण वाचा : आजचे हरभरा बाजार भाव | महाराष्ट्रात हरभऱ्याला काय बाजार भाव मिळाले पहा नवीन बाजार भाव

Leave a Comment